संतोष कानडे
लख्खीराय बंजारा हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं नसेल. परंतु ते त्या काळातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते.
आशिया खंडात तेव्हा लख्खीराय बंजारा हे सर्वात श्रीमंत होते, अशी ख्याती आहे. ते तांडे चालवायचे, व्यापार करायचे.
जगातला सगळ्यात मोठा किल्ला म्हणून ओळख असणारा हरियाणातला लोहगडदेखील त्यांच्याच अधिपत्याखाली होती.
शाहजहान आणि औरंगजेब यांच्या दरबारामध्ये लख्खीराय यांना लख्खीशाह अशी ओळख होती.
दिल्लीमध्ये असलेल्या सुप्रसिद्ध लाल किल्ल्याच्या बांधकामाचे लख्खीराय हे कंत्राटदार होते.
दिल्लीतली मालदा, रायसीना, बहारखंबा, नेरला ही चार गावे मुघलांनी त्यांना बक्षीस दिलेली होती.
लोहगड किल्ल्याच्या आसपास लख्खीराय यांनी ८० शीख गावे वसवली होती. तिथे त्यांनी लोकांना रोजगार दिला.
वयाच्या शंभराव्या वर्षी लख्खीराय बंजारा यांचं निधन झालं. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी शीख धर्माचा प्रसार केला.
आनंदपूर येथे झालेल्या युद्धामध्ये लख्खीशाह बंजारा यांचे तिनही पुत्र शहीद झाले.