संतोष कानडे
हजारो वर्षांचा भारताचा इतिहास गौरवशाली आहे. या इतिहासाच्या पाऊलखुणा आजही प्रेरणादायी ठरतात.
ही गोष्ट अशा राजाची आहे, ज्याने काश्मीरवर राज्य केलं आणि आपल्या साम्राज्याचा पसारा चीनपर्यंत वाढवला.
ललितादित्य मुक्तापीड असं या राजाचं नाव आहे. परंतु इतिहासामध्ये या राजाचा फारसा उल्लेख सापडत नाही.
ललितादित्य यांनी काश्मीरवर इ.स. ७२४ ते ७६० या काळामध्ये राज्य केलं. या काळात ज्याने काश्मीकडे वाकडा डोळा केला, त्याला जशासतसं उत्तर मिळालं.
ललितादित्य यांच्या शासनकाळामध्ये काश्मीर राज्याच्या सीमा विदेशापर्यंत पोहोचल्या होत्या.
कार्कोट राजवंशाचे राजा ललितादित्य यांनी आपल्या ३७ वर्षांच्या काश्मीर राज्याला मध्य अशियापासून गंगेच्या मैदानी भूप्रदेशापर्यंत विस्तारलं होतं.
ललितादित्य यांना काश्मिरी इतिहासातला सिकंदरही म्हटलं जातं. त्यांनी तुर्क, तिबेट आणि बाल्टिस्तानपर्यंत विजय मिळवला होता.
काश्मिरी इतिहासावर आधारित लिहिलेलं संस्कृत पुस्तक राजतरंगिणीमध्ये ललितादित्य राजाच्या शासनकाळाविषयी माहिती दिली.
कार्कोट राजवंशाची स्थापना इ.स. ६२४ मध्ये राजा दुर्लभवर्धन यांनी केली होती. ललितादित्य हे त्यांचे नातू होते.