Shubham Banubakode
बलोच लिबरेशन आर्मीने नुकतान पाकिस्तानमधील एका ट्रेनचं अपहरण केलं होतं. त्यामुळे बलूचीस्तान पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
विशेष म्हणजे याच बलुचीस्तानचं महाराष्ट्राशी एक विशेष नातं आहे.
पानिपताच्या युद्धात अहमदशाह अब्दालीने मराठ्यांचा पराभव केला होता.
या युद्धानंतर अब्दालीच्या अफगाण सेनेने जवळपास २२ हजार मराठा युद्धकैदी पकडले.
हे युद्ध कैदी आणि लुटीचा माल घेऊन तो अफगाणिस्तानच्या दिशेने निघाला.
या युद्धात बलूचीस्तानमधील मीर नसीर खानला अब्दालीला मदत केली होती. त्यामुळे अब्दालीने त्याला मराठा युद्ध कैदी भेट दिले.
मीर नसीर खानाने आपल्या सैन्यातील वेगवेगळ्या जमातीमध्ये या सैनिकांना गुलाम म्हणून वाटलं.
पुढे १९४४ साली हे मराठे सैनिक गुलामगिरीतून मुक्त झाले. यादरम्यान ते बलूचीस्तानच्या संस्कृतीमध्ये मिसळले.
बलूचीस्तानमधील मराठ्यांना बुगटी मराठा म्हणून ओळखले जाते. यापैकी साहू मराठा जमातीचे मराठे हे शेतीत पारंगत होते.
साहू मराठे धर्माने मुसलमान बनले मात्र आपल्या मराठी संस्कृतीच्या परंपरा विसरले नाहीत.आजही मराठी प्रथा पाळतात.
महाराष्ट्राच्या मुख्य भूमीपासून लाखो मैल दूर असलेल्या मराठ्यांनी आजही आपली संस्कृती जपून ठेवली आहे.