महाराष्ट्रातल्या 'या' गावात औरंगजेब झाला होता लंगडा

Shubham Banubakode

माणगंगेचा पूर

मुघल साम्राज्य वाढवण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला माणगंगेच्या पुराचा चांगलाच फटका बसला होता.

Aurangzeb Became Lame in Maharashtra

|

esakal

लाखोंची फौज

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा साम्राज्य सहज जिंकू, असा औरंगजेबाचा समज होता. लाखोंची फौज घेऊन तो महाराष्ट्रात उतरला.

Aurangzeb Became Lame in Maharashtra

|

esakal

औरंजेबाची छावणी

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात असलेल्या खवासपूर गावाजवळ माणगंगा नदीच्या कोरड्या पात्रात औरंगजेबाच्या सैन्याने छावणी टाकली होती.

Aurangzeb Became Lame in Maharashtra

|

esakal

धोका

माणगंगा साधारणपणे कोरडीच असायची. त्यामुळे नदीच्या पात्रात छावणी असूनही औरंगजेबाच्या सैनिकांना कोणताही मोठा धोका वाटत नव्हता.

Aurangzeb Became Lame in Maharashtra

|

esakal

धावपळ

पण रात्री जोरदार पाऊस झाला आणि अचानक माणगंगेला पूर आला. झोपलेल्या मुघल छावणीत पाणी घुसल्याने एकच धावपळ उडाली.

Aurangzeb Became Lame in Maharashtra

|

esakal

छावणीत गोंधळ

अचानक आलेला गोंधळ पाहून मराठ्यांनी हल्ला केला असावा, असा संशय औरंगजेबाला आला. जीव वाचवण्यासाठी तो अंधारात सैरावैरा धावू लागला.

Aurangzeb Became Lame in Maharashtra

|

esakal

गुडघ्याला दुखापत

पळताना औरंगजेबाचा पाय घसरला आणि त्याचा उजवा गुडघा दगडावर जोरात आदळला. गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि तो कायमचा लंगडा झाला.

Aurangzeb Became Lame in Maharashtra

|

esakal

महाराष्ट्रातच शेवट

मराठा साम्राज्य संपवण्याच्या हट्टाने आलेल्या औरंगजेबाला अखेर महाराष्ट्रातच मोठे धक्के बसले. १७०७ मध्ये याच भूमीत त्याचा शेवट झाला.

Aurangzeb Became Lame in Maharashtra

|

esakal

या मुघल बादशहाने गादीवर बसताच दान केली होती लाखो बीघा जमीन

Shah Jahan and Mumtaz Mahal

|

esakal

हेही वाचा -