कोण होते स्वराज्याचे दुसरे तानाजी? सिंहगडाला..

सकाळ डिजिटल टीम

किल्ल्यांचा अभेद्य रक्षक – नावजी बलकवडे

औरंगजेबाच्या आक्रमणानंतर स्वराज्य संकटात असताना नावजी बलकवडे यांनी पुन्हा अनेक किल्ले जिंकून इतिहास रचला.

Sakal

स्वराज्यावर मुघलांचा भयंकर आघात

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगड, राजगड, पुरंदर, सिंहगड मुघलांच्या ताब्यात गेले.

Sakal

राजाराम महाराजांचा जिंजीकडे प्रवास

मुघलांच्या आक्रमणात राजाराम महाराजांना दक्षिणेतील जिंजीवर आश्रय घ्यावा लागला.

Sakal

नावजी बलकवडे यांचा पराक्रम

या संकटात सरदार नावजी बलकवडे यांनी सिंहगड, लोहगड व कोरीगड पुन्हा स्वराज्यात आणले.

Sakal

सिद्दीचा आणि मुघलांचा पराभव

नावजी बलकवडे यांनी कुर्डुघाटात सिद्दी आणि जांभुळने येथे मन्सूरखान बेगचा पराभव केला

Sakal

सिंहगडाची दुसरी शौर्यगाथा

सिंहगड पहिल्यांदा तानाजी मालुसरे यांनी जिंकला होता. पुढे तो मुघलांकडे गेला.

Sakal

आषाढ शुद्ध अष्टमी – १ जुलै १६९३

याच दिवशी नावजी बलकवडे यांनी सिंहगड पुन्हा स्वराज्यात आणला.

Sakal

राजाराम महाराजांचा गौरव

छत्रपती राजाराम महाराजांनी ३ एप्रिल १६९४ रोजी कौतुकाचे पत्र पाठवले.

Sakal

इनाम गावाची देणगी

या पराक्रमासाठी त्यांना पवना मावळातील सावरगाव इनाम म्हणून देण्यात आले.

Sakal

नावजी बलकवडे – विसरलेला वीर

स्वराज्य रक्षणासाठी झटणाऱ्या नावजी बलकवडे यांचा पराक्रम इतिहासात अजरामर आहे.

Sakal

सैतानाशी करार केला अन् एका रात्रीत लिहिलं गेलं हे भलं मोठं रहस्यमय पुस्तक; कोट्यवधी दिले तरी मिळत नाही पुस्तक!

Mysterious Story of the Devil's Bible Book | esakal
येथे क्लिक करा