kimaya narayan
मराठी इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रिटी कपल गाजले. त्यातील अनेकांनी लग्नही केलं पण नंतर त्यानी घटस्फोट घेतला. यातील काही कलाकार असेही आहेत ज्यांचा दोनदा घटस्फोट झालाय. जाणून घेऊया या कलाकारांविषयी.
मराठी इंडस्ट्रीमधील अभिनयसंपन्न अभिनेत्री भार्गवीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. भार्गवीचं पंकज एकबोटेशी 2012 मध्ये लग्न झालं. पण त्यांचा काही काळातच घटस्फोट झाला.
पहिल्या लग्नानंतर भार्गवीने दुसरं लग्नही केलं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. 2015 मध्ये तिने घटस्फोट घेतला. तिच्या दुसऱ्या पतीविषयी फार माहिती उपलब्ध नाही.
अभिनेता पियुष रानडेची तीन लग्न झाली आहेत. त्याचं पहिलं लग्न 2010 मध्ये शाल्मली टोळ्येशी झालं. पण 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
पियुषने दुसरं लग्न मयुरी वाघशी केलं. 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं पण लवकरच त्यांचा घटस्फोट झाला.
पियुषने तिसरं लग्न अभिनेत्री सुरुची आडारकरशी डिसेंबर 2023मध्ये केलं. त्यांच्या लग्नाने अनेक चाहत्यांना धक्का बसला.
अभिनेता आविष्कार दारव्हेकर आणि अभिनेत्री स्नेहा वाघ यांचा दोनदा घटस्फोट झालाय. 2007 मध्ये त्यांनी लग्न केलं पण लगेचच त्यांचा घटस्फोट झाला. घरगुती हिंसाचाराचे आरोप स्नेहाने केले होते.
स्नेहाने दुसऱ्यांदा 2015मध्ये अनुराग सोलंकीशी लग्नगाठ बांधली. पण वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला.
अविष्कारने दुसरं लग्न स्मिता नावाच्या महिलेशी केलं. त्यांना एक मुलगाही होता पण त्यांचा घटस्फोट झाला. तिला फसवून त्याने तिसरं लग्न केल्याचा आरोप त्याच्या दुसऱ्या पत्नीने केला.
मराठीतील दिग्गज दिग्दर्शक व्ही शांताराम यांचीही तीन लग्न झाली. त्यांचं पहिलं लग्न विमलाबाई यांच्याशी झालं. त्यांच्याशी घटस्फोट न घेता ते वेगळे झाले आणि त्यांनी जयश्री यांच्याबरोबर संसार थाटला. त्यानंतर त्यांनी जयश्री यांना घटस्फोट देऊन संध्या यांच्याशी विवाह केला.