Monika Shinde
पुण्याजवळच्या दिवेघाटात वसलेला मस्तानी तलाव, निसर्ग आणि इतिहासाचा अद्भुत संगम आहे. या तलावाचं नाव मस्तानीबाईंच्या आठवणींनी अजरामर झालं आहे.
वडकी गावाजवळचा हा तलाव, पावसाळ्यात हिरवाईने नटतो. या निसर्गरम्य ठिकाणी बसून शांततेचा अनुभव घेता येतो.
असे म्हणतात, थोरले बाजीराव पेशवे मस्तानीबाईंना घेऊन इथे विश्रांतीसाठी यायचे. तलावाच्या तीरावर त्यांच्या सहवासात क्षण घालवत असत.
बाजीरावांनी तलाव बांधण्याआधी संपूर्ण परिसराचा अभ्यास केला होता. पाऊस, प्रवाह, खोऱ्यांची दिशा यांचा विचार करून तलावाची रचना करण्यात आली.
सहा ते बारा फूट जाडीच्या भिंती, तीन बुरुज, ओटे, कोनाडे, आणि भुयारी मार्ग याने सजलेला हा तलाव कलेचं प्रतीक आहे.
तलावाजवळ गणेश, हनुमान आणि महादेवाची मंदिरे असून, उघड्यावर काही मूर्ती आहेत. इथे पूर्वी महाल होता, त्याचे खांब अजूनही शिल्लक आहेत.
पावसाळ्यात तलावात पाणी भरते, हिरवाई फुलते आणि हा परिसर अधिकच सुंदर दिसतो. पक्ष्यांचा किलबिलाट आणि लाटांचे संगीत मन मोहून टाकतात.
मस्तानी तलाव केवळ निसर्ग किंवा इतिहास नाही, तर आपल्याला आपल्या वारशाची जाणीव करून देणारा एक जीवंत अनुभव आहे. इथे जरूर भेट द्या!