Vinod Dengale
महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून मुक्त केलेल्या एका गिधाडाने तब्बल 3,334 किलोमीटर अंतर पार करत राजस्थानमधील रणथंबोर व्याघ्र प्रकल्प गाठला.
हे गिधाड 28 मे रोजी मेळघाटातून निघाले आणि केवळ 27 दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान असा लांबचा प्रवास पूर्ण केला.
प्रवासादरम्यान गिधाडाने सातपुडा व्याघ्र प्रकल्प, भोपाळ परिसर आणि कुनो राष्ट्रीय उद्यानात मुक्काम केला.
या गिधाडाचे नाव 'X67' असून ते 5 वर्षांचे मादी गिधाड आहे. जानेवारीमध्ये मेळघाटातून सोडलेल्या 15 गिधाडांपैकी हे एक आहे.
X67 सह सर्व गिधाडांना सोलर GPS ट्रॅकिंग टॅग लावण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर वैज्ञानिकांचे लक्ष आहे.
हे गिधाड संपूर्ण प्रवासात कोणत्याही अतिरिक्त अन्नाशिवाय नैसर्गिक अधिवासात टिकून राहिले आणि स्वतःचे अन्न शोधत राहिले.
पिंजऱ्यात वाढलेली गिधाडे जंगलात टिकू शकतात, अन्न शोधू शकतात आणि हजारो किलोमीटर उडू शकतात, हे या प्रवासाने सिद्ध केले.
गिधाडांच्या पायात लावलेली निळ्या रंगाची कडी हे गिधाड भारतातील असल्याचे दर्शवते. त्यावरील 'M' हे महाराष्ट्राचे प्रतीक आहे.
Maharashtra's First Khatu Shyam Temple: A New Hub of Faith and Devotion
esakal