Monsoon Tourism India : पावसाळ्यानंतर भारताची 'ही' 8 ठिकाणं बनतात थेट स्वर्ग; निसर्गाची जादू पाहायची असेल तर आत्ताच प्लॅन करा!

बाळकृष्ण मधाळे

मान्सूनमध्ये फिरायचे आहे?

पावसाळा हा निसर्गप्रेमींसाठी खास पर्वणी मानला जातो. मुसळधार पावसानंतर देशातील अनेक पर्यटनस्थळांचे रूपच पालटते.

Monsoon Tourism India

|

esakal

भारतातील सर्वोत्तम मान्सून पर्यटनस्थळे

हिरवागार निसर्ग, धुक्याने झाकलेल्या टेकड्या, खळखळणारे धबधबे आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेले परिसर पर्यटकांना भुरळ घालतात. अशाच काही ठिकाणांची माहिती जाणून घेऊया, जी मान्सूननंतर अक्षरशः नंदनवनात रूपांतरित होतात.

Monsoon Tourism India

|

esakal

1. कूर्ग, कर्नाटक

‘भारताचे स्कॉटलंड’ म्हणून ओळखले जाणारे कूर्ग पावसाळ्यानंतर अधिकच मोहक दिसते. कॉफीच्या मळ्यांमधून दरवळणारा सुगंध, धुक्याने वेढलेल्या टेकड्या आणि फेसाळत कोसळणारे धबधबे या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतात.

Monsoon Tourism India

|

esakal

2. मुन्नार, केरळ

केरळमधील मुन्नार हे वर्षभर पर्यटकांचे आकर्षण असले तरी मान्सूननंतर येथील निसर्ग विशेष खुलतो. हिरव्यागार चहाच्या मळ्यांनी सजलेल्या टेकड्या आणि ढगांच्या सान्निध्यात हरवलेल्या दऱ्या पाहणाऱ्यांना अविस्मरणीय अनुभव देतात.

Monsoon Tourism India

|

esakal

3. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, उत्तराखंड

उत्तराखंडमधील प्रसिद्ध ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणजेच फुलांची दरी मान्सूनमध्ये आपल्या सर्वोत्तम रूपात दिसते. पावसाच्या सरींनंतर संपूर्ण दरी विविध रंगांच्या रानफुलांनी बहरून जाते. निसर्गाने सजविलेल्या या फुलांच्या गालिच्यावर नजर पडताच पर्यटक मंत्रमुग्ध होतात.

Monsoon Tourism India

|

esakal

4. सोहरा (चेरापुंजी), मेघालय

जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भागांपैकी एक असलेले सोहरा, म्हणजेच चेरापुंजी, मान्सूनमध्ये स्वर्गीय रूप धारण करते. येथील भव्य धबधबे, दाट हिरवळ आणि प्रसिद्ध ‘लिव्हिंग रूट ब्रिजेस’ पर्यटकांना निसर्गाच्या अद्भुत किमयेचा अनुभव देतात.

Monsoon Tourism India

|

esakal

5. झिरो दरी, अरुणाचल प्रदेश

शांतता आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली झिरो दरी मान्सूननंतर अधिकच आकर्षक दिसते. हिरवाईने नटलेली भातशेती, डोंगररांगा आणि प्रसन्न वातावरण शहराच्या गोंगाटापासून दूर एक वेगळीच अनुभूती देते.

Monsoon Tourism India

|

esakal

6. कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान, कर्नाटक

ट्रेकिंगप्रेमींसाठी आवडते ठिकाण असलेले कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान पावसाळ्यानंतर नव्या जोमाने खुलते. हिरव्यागार दऱ्या, घनदाट अरण्ये आणि विस्तीर्ण कुरणे यामुळे येथे ट्रेकिंगचा आनंद अनेक पटींनी वाढतो.

Monsoon Tourism India

|

esakal

7. झुकू दरी, नागालँड-मणिपूर सीमा

नागालँड आणि मणिपूरच्या सीमेवरील झुकू दरी ही ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच मानली जाते. पावसाळ्यानंतर येथील हिरवीगार कुरणे आणि फुलांनी बहरलेली दरी नयनरम्य दृश्य निर्माण करते.

Monsoon Tourism India

|

esakal

8. तीर्थन आणि सैंज दऱ्या, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील तीर्थन आणि सैंज दऱ्या मान्सूननंतर विशेष आकर्षक दिसतात. स्वच्छ आणि खळाळत्या नद्या, देवदार वृक्षांची घनदाट जंगले आणि पर्वतांच्या कुशीत वसलेली सुंदर गावे पर्यटकांना निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातात.

Monsoon Tourism India

|

esakal

सहलीचे नियोजन आताच करा!

जर तुम्ही यंदाच्या पावसाळ्यात किंवा त्यानंतर निसर्गाच्या सान्निध्यात काही अविस्मरणीय क्षण अनुभवण्याचा विचार करत असाल, तर ही आठ ठिकाणे तुमच्या पर्यटन यादीत नक्की असावीत. हिरवाईने नटलेला निसर्ग, मनमोहक दृश्ये आणि शांत वातावरण यामुळे तुमची सहल संस्मरणीय ठरेल.

Monsoon Tourism India

|

esakal

Monsoon Forecast : हवामान खातं नाही, तर 'हा' छोटासा पक्षी सांगतोय यंदा पाऊस कसा होणार; ग्रामीण भागातील पिढ्यान् पिढ्यांचा विश्वास!

how baya bird nests predict rainfall

|

esakal

येथे क्लिक करा...