सकाळ डिजिटल टीम
रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेचे विजेतेपद मुंबई संघाने जिंकले.
मुंबईने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला आणि 42 व्यांदा रणजी ट्रॉफी उंचावली. यासह रणजी ट्रॉफीचा 89 वा हंगाम संपला.
दरम्यान या रणजीच्या 89 व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांवर एक नजर टाकू.
आंध्रप्रदेशच्या रिकी भूईने या हंगामात 8 सामन्यात 75.16 च्या सरासरीने सर्वाधिक 902 धावा केल्या. यात 4 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
केरळच्या सचिन बेबीने या हंगामात 7 सामन्यांत 83 च्या सरासरीने 4 शतके आणि 4 अर्धशतकांसह 830 धावा केल्या.
सौराष्ट्राचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने या रणजी हंगामात 8 सामने खेळताना 69.08 च्या सरासरीने 829 धावा केल्या, ज्यात 3 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
तमिळनाडूकडून एन जगदिशनही या हंगामात शानदार खेळला. त्याने 9 सामन्यांत 74.18 च्या सरासरीने 816 धावा केल्या. यामध्ये 2 शतके आणि 1 अर्धशतकांचा समावेश. दरम्यान त्याने या हंगामात त्रिशतकही केले.
बडोद्याच्या शाश्वत रावतने या हंगामात 8 सामने खेळले, ज्यात त्याने 60.3 च्या सरासरीने 784 धावा केल्या. यामध्ये 4 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.