Monika Shinde
आपण सर्वजण शॉवरने आंघोळ, स्विमिंगपूलमध्ये अंगोळ किंवा टबमध्ये अंघोळ करण्याचा अनुभव घेतला असेल. पण तुम्ही कधी ऐकले आहे का, मातीने अंघोळ करण्याची परंपरा आहे. काय आहे आहेत याचे फायदे जाणून घेऊया
मातीने अंघोळ म्हणजे 'मडबाथ' ही अनोखी परंपरा नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आनंद हजारो नागरिक मुंबई पुण्यासह अन्य शहरातून यामध्ये सहभागी होतात.
मडबाथ केल्याने त्वचेवरील घाण, तेलकटपणा काढून टाकते आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवते.
माती लावल्यानं शरीराला गारवा मिळतो आणि तापमान नियंत्रणात राहतं.
खाज, गजकर्ण, पुरळ, अलर्जी यांसारख्या त्वचा विकारांवर मातीचा लेप उपयुक्त आहे.
पोटावर मातीचा लेप दिल्यास गॅस, अॅसिडिटी कमी होण्यास मदत होते.
साफ, प्रदूषणमुक्त माती थोड्या पाण्यात भिजवून शरीरावर लावा. 15-20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने अंघोळ करा.