सकाळ वृत्तसेवा
मुघलांच्या वाईट सवयींमुळे त्यांच्या राण्या आणि शहजाद्या रात्र-रात्र झोपू शकत नव्हत्या.
मुघल बादशाह रात्री उशिरा हरममध्ये पोहोचायचे आणि पहाटेपर्यंत हरममध्येच थांबायचे.
रात्रभर, नाचगाणं, अय्याशी सुरु असायची. त्यातच बादशाह आपल्या आवडत्या स्त्रीसोबत वेळ घालवायचे.
त्यामुळे महिलांना तिथेच थांबून बादशहासाठी दारु तयार ठेवावी लागत असे.. काहींना नृत्यकला सादर करावी लागे.
रात्रभर सुरु असलेलं नाचगाणं, आवाज.. यामुळे हरममध्ये शांतता नसायची. त्यामुळे शहजाद्या झोपू शकत नसायच्या.
मात्र बादशहाला कशाचीही पर्वा नसायची. राण्या, शहजाद्या, दासी.. सगळेच ताटकळत बसलेले असायचे.
हरममध्ये बादशहाच्या विरोधात कधीच कुणी तक्रार करु शकत नसायचं. हरमचे नियम कठोर होते.
महिलांनी हरमचे नियम मोडले तर त्यांना तळघरात फासावर दिलं जायचं. आणि आतल्या मार्गाने प्रेत बाहेर फेकून दिलं जायचं.
हरममधल्या महिलांना बादशहाशिवाय इतर पुरुषांकडे बघणंसुद्धा गुन्हा होता. तसं कुणी केलं तर शिक्षा निश्चित.
एवढंच नाही तर हरमच्या सुरक्षेसाठी धष्टपुष्ट महिला किंवा किन्नरांची नेमणूक केली जात होती.