संतोष कानडे
मुघलांनी भारतावर शेकडो वर्षे राज्य केलं. त्यांनी त्यांच्या शासनकाळात जे कायदे बनवले त्याची आजही चर्चा होत असते.
बादशहाचा प्रोटोकॉल आणि त्यांची राज्य करण्याची पद्धत भारतीय राजांपेक्षा वेगळी होती. मुघलांमध्ये हरम नावाचा प्रकार होता.
सोप्या शब्दांमध्ये सांगायचं तर हरम एक अशी जागा होती जिथे मुघल बादशहाशी जोडल्या गेलेल्या बायका रहायच्या. विशेषतः त्यांच्या अनेक पत्नी.
ज्या महलामध्ये मुघल बादशहाच्या अनेक बेगम रहायच्या, त्याला हरम म्हटलं जायचं. या महलामध्ये बादशहाशिवाय अन्य कुठल्या पुरुषाला प्रवेश नसे.
हरम नावाचा प्रकार तयार करण्याची प्रक्रिया जुनीच होती. अबू फजल याने अकबरनामा या पुस्तकामध्ये यावर लिहिलेलं आहे.
त्यात म्हटलंय की, हरम बनवण्याची प्रक्रिया बादशहा बाबरने सुरु केली होती. परंतु खऱ्या अर्थाने अकबराने याची सुरुवात केली.
त्यानंतर जेव्हा जहांगिर बादशहाचं शासन आलं तेव्हा हरम बनवण्याची प्रक्रिया आणि त्याची देखरेख यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं.
हरममधील पत्नींसोबत बादशहा जेवण घेत असे. खास शाही पद्धतीने बादशहासाठी खानसामे स्वयंपाक करायचे.
बादशहा हरममध्ये बेगमांसोबत वेळ घालवायचे, तिथे अय्याशीदेखील चालायची. त्यासाठी हरमचं वातावरण खास असायचं.
औरंगजेब बादशहा सत्तेवर आल्यानंतरर मुघलांची ही हरम परंपरा संपुष्टात आली. या हरमची आजही चर्चा होते.