संतोष कानडे
मुघल भारतात आल्यानंतर युद्धपद्धतीत खूप बदल झाले. पारंपरिक शस्त्रांऐवजी तोफा, दारूगोळा आणि बंदुका वापरल्या जाऊ लागल्या.
१५२६ मध्ये बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला. या युद्धात पहिल्यांदाच तोफांचा वापर झाला.
मुघलांनी घोडेस्वार, तोफखाना आणि सैन्याच्या तुकडी तंत्रावर जास्त भर दिला.
मुघलांच्या काळात हलक्या आणि मध्यम तोफा सहजपणे हलवता येऊ लागल्या.
भारतीय तोफा जड आणि पितळेच्या बनलेल्या होत्या. याउलट, मुघल हलकी, जलद वापरता येणारी शस्त्रे वापरत असत. मोठ्या तोफा हलवण्यासाठी हत्तींचा वापर केला जाई.
मुघल सैनिक 'तुफंगस' नावाच्या बंदुका वापरत. यातून अचूक लक्ष्य साधता येत होते.
मुघलांनी प्रत्येक प्रांतात छावण्या (कँटोन्मेंट) उभारल्या. मनसबदारांची नेमणूक केली आणि उत्तम जातीचे घोडे बाहेरून मागवले.
मुघलांनी फक्त थेट युद्धच नाही, तर किल्ल्यांना वेढा घालण्याचे तंत्रही वापरले. त्यांनी चित्तोड, रणथंबोर येथील किल्ल्यांमधील रसद बंद करून विजय मिळवला.
पाच हजारांहून अधिक कारागीर, टँकर (पाणीवाहू) आणि सुतार आधीच युद्धक्षेत्रात पाठवले जात असत. हे लोक लढाईत थेट भाग घेत नव्हते, पण खूप महत्त्वाचे होते.
अकबरने आपले साम्राज्य वाढवले. औरंगजेबाने तर २७ वर्षे सतत युद्धात घालवली. मुघल साम्राज्याचा युद्धकाळात खूप विकास झाला.
मात्र मराठ्यांना हरवणे मुघलांना कठीण गेले. 'गनिमी कावा' ही युद्धनीती महाप्रचंड मुघल सेनेला झेपली नाही. त्यामुळे औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रात झाला.