संतोष कानडे
दिवाळीच्या दिवशी मुघलांच्या महलामध्ये भाज्या आणण्यास निर्बंध होते. याचं कारण होतं भीती.
काळ्या जादूच्या भीतीमुळे मुघल आपल्या महलांमध्ये दिवाळीला भाज्या आणत नसत.
भाज्यांचा उपयोग करुन तांत्रिक क्रिया आणि जादूटोना व्हायचा, असा समज मुघलांना होता.
मुघलांचा महल हा सम्राटाचं निवासस्थान होतं, त्यामुळे तेथील खास व्यक्ती आणि महिलांना सुरक्षित ठेवलं जात असे.
जर दिवाळीच्या काळात भाज्या हव्या असती तर त्यासाठी खास विधी केला जात असे. त्या भाज्या व्यवस्थित प्रक्रियेद्वारे महलात येत असत.
वांगी, मुळा, भोपळा, गाजर अशा भाज्या वापरण्यापूर्वी विशिष्ट प्रक्रियेतून जात असत. भाज्यांची सालं काढली जात असत.
एवढंच नाही तर दिवाळीमध्ये महलात अतिरिक्त हालचालींवर प्रतिबंध असे. कुणालाही महलाच्या बाहेर जाण्यासाठी किंवा आतमध्ये येण्यासाठी कडक नियम होते.
महलात कुणी तंत्रक्रिया करु नये, त्यासाठी कुणाची घुसखोरी होता कामा नये, असं दंडक मुघलांनी घातलेला होता.
केवळ दिवाळीच नाही तर मुघलांनी इतरही सणोत्सवांसाठी खास नियम तयार केलेले होते. ते नियम कटेकोरपणे पाळले जात असत.