संतोष कानडे
पूर्वीच्या काळी गडकोटांवर तुपाच्या विहिरी असायच्या. आजही पावनगडावर तुपाची विहिर आहे.
पूर्वी गडावरुन सत्ता सांभाळली जात असे. तेव्हा तिथला वतनदार, जहागिरदार टॅक्स म्हणून काही पदार्थ गोळा करीत असे.
तूप हा त्यातलाच एक प्रकार. रयतेकडून तूप घेतलं जात असे आणि ते साठवलं जात असे.
विशेष म्हणजे हे तूप साठवण्यासाठी गडावर छोट्या आकाराच्या विहिरी बांधल्या जात असत.
काही गडांवर तुपाच्या टाक्या, हांडे असत. जेवढं तूप जुनं तेवढं ते परिणामकारक असे. ही विहीर पावनगडावरील आहे.
हे तूप सैनिकांच्या जखमांवर औषध म्हणून वापरलं जात असे. लढाईमध्ये सैनिक जखमी होत, तेव्हा ते कामी येई.
विशेष म्हणजे आज्ञापत्रांमध्ये तुपाच्या विहिरींचा उल्लेख आहे. विहीर कशी बांधावी, दगड कसा असावा, हे सांगितलं जात असे.
विहिरीसाठी काळा कुळकुळीत, भेगा न पडलेला दगड वापरला जावा.. भेगा असतील तर तिथे चुन्याचा लेप द्यावा,असं अज्ञापत्र आहे.
विहिरीमधून तूप पाझरुन खाली जाऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात असे.