Puja Bonkile
भारतीय संस्कृतीत नमस्कार करण्याला खुप महत्व आहे.
देवासमोर किंवा मोठ्या वडीलधारी व्यक्तींसमोर नमस्कार केला जातो. नमस्कार म्हणजे समोरच्या व्यक्तीला आदरभाव व्यक्त करणे.
नमस्कार करण्यासाठी दोन्ही हात जोडावे लागतात. दोन्ही हात समोरासमोर सरळ असावेत.
नमस्कार करताना दोन्ही हात जोडावे लागतात. यामध्ये दोन्ही हाताचे तळवे दाबले जातात. त्यामुळे मेंदु आणि हृदय सक्रिय होतात आणि पुर्वीपेक्षा चांगले काम करू लागतात.
नमस्कार केल्याने मनात चांगल्या भावना निर्माण होतात.
नमस्कार करताना तुमचे दोन्ही हात जोडता. हे समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम, आपुलकी आणि आदर दर्शवते. यामुळे इतरांबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढते.
नमस्कार करतो तेव्हा दोन्ही हाताचे तळवे जोडतो किंवा दाबतो तेव्हा हृदय चक्र आणि अज्ञ चक्र सक्रिय होऊ लागतात, ज्यामुळे सकारात्मकता निर्माण होते आणि मन शांत होते.
यामुळे तुमचे हृदय मजबूत होते आणि तुमच्या आत असलेली भीती निघून जाते.