Monika Shinde
नारळीपौर्णिमा म्हणजे समुद्राची पूजा, रक्षाबंधन व धार्मिक विधींचा दिवस. या दिवशी काही खास गोष्टी कराव्यात, आणि काही टाळाव्यात, याची माहिती घेऊया.
समुद्राला नारळ अर्पण करावा. हे श्रद्धेचं प्रतीक असून, सुरक्षित प्रवास आणि समृद्धी मिळावी यासाठी महत्त्वाचं मानलं जातं.
भावाने बहिणीचे रक्षण करायचे वचन द्यावे. राखी बांधल्यावर तिला गोडधोड खाऊ घालावे आणि तिला काहीतरी भेटवस्तू द्यावी.
श्रावणातील ही पौर्णिमा असल्यामुळे उपवास करावा. सकाळी स्नान करून देवांची पूजा, मंत्रजप व आरती करावी.
या दिवशी समुद्र पूजेला अर्पित असतो. त्यामुळे समुद्रात पोहणे, अति उच्छाद करणे किंवा जलक्रीडा टाळाव्यात.
या दिवशी धार्मिक वातावरण असते. अनेक लोक उपवास करतात. म्हणून मांसाहार, मद्यपान किंवा अशुद्ध आचरण टाळावं.
समुद्राला अर्पण केलेला नारळ पूजा मानला जातो. तो पुन्हा घरी आणून खाणं किंवा फोडणं हे अपशकुन मानलं जातं.
नारळीपौर्णिमा श्रद्धा, निसर्गपूजा आणि कुटुंबबंध दृढ करणारा सण आहे. तो भक्तिभावाने, नियमांचं पालन करून साजरा करावा.