Monika Shinde
नाकात दोन थेंब तूप टाकण्याची आयुर्वेदिक पद्धत हजारो वर्षांपासून वापरली जाते. यामुळे शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतात.
नाकात तूप टाकल्याने नाकातील कोरडेपणा कमी होतो. धूळ, प्रदूषण आणि कोरड्या हवेमुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत होते.
ही पद्धत मेंदू शांत ठेवण्यास मदत करते. एकाग्रता वाढते आणि मानसिक तणाव कमी होण्यास सहाय्य होते.
नाक आणि सायनस स्वच्छ राहण्यास मदत होते. सर्दी, नाक बंद होणे आणि डोकेदुखीच्या त्रासात आराम मिळू शकतो.
नाकातील नसांचा थेट संबंध मेंदूशी असतो. त्यामुळे तूप टाकल्याने स्मरणशक्ती आणि विचारशक्ती सुधारण्यास मदत होते.
झोप न येणे किंवा अस्वस्थ झोपेचा त्रास असल्यास ही आयुर्वेदिक पद्धत उपयुक्त ठरू शकते. मन शांत झाल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते.
नाकात तूप टाकल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो. त्वचा आणि डोळ्यांना नैसर्गिक आर्द्रता मिळण्यास मदत होते.
तूप वापरण्यापूर्वी ते शुद्ध आणि गाईचे असावे.
कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच सुरक्षित ठरते.