पुजा बोनकिले
पहलगाम येथील दहशतवादी हल्यात नागरिकांना ठार करण्यात आले.
यानंतर संपुर्ण देश हादरला होता.
चौदा दिवसानंतर मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर मार्फत या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय सैन्यांनी मध्यरात्री १.३० वाजता नऊ दहशतवादी अड्ड्यांवर यशस्वी एअर स्ट्राईक केली आहे.
भारतीय सैन्य दलाने जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तैयबाचे तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळाली आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तानात १०० किलोमीटर आत घूसून हल्ला केला आहे.
ऑपरेशन सिंदूरमुळे पहलगाम पिडित कुटूंबाला समाधान मिळाले आहे.
या हल्ल्यात भारतीय सैन्यांनी राफेल आणि सुखोई फायटर जेटचा समावेश केला होता.