का आहे 'पंचकर्म' आयुर्वेदातील सुपर डिटॉक्स?

Anushka Tapshalkar

आयुर्वेद काय सांगतो?

शरीरात साचलेले 'आम' म्हणजेच विषारी द्रव्ये थकवा, त्वचेसंबंधी त्रास आणि पचनाच्या समस्या निर्माण करतात.

Ayurveda | sakal

पंचकर्म म्हणजे काय?

'पंचकर्म' म्हणजे शरीरशुद्धीसाठीचे पाच उपचार. हे केवळ डिटॉक्स नव्हे, तर नवचैतन्य देणारी प्रक्रिया आहे.

What Is Panchakarma | sakal

वमन (Vaman)

औषधींच्या मदतीने उलटी करून फुफ्फुसांतील व पचनातील अतिरिक्त कफ काढून टाकला जातो.

Vaman | sakal

विरेचन (Virechan)

औषधी देऊन जुलाबाद्वारे यकृत, आतडे आणि पित्तशुद्धी केली जाते.

Virechan | sakal

बस्ती (Basti)

तेल किंवा औषधी काढ्यांच्या एनीमा उपचारांद्वारे कोलन डिटॉक्स म्हणजेच मोठ्या आतड्याचं शुद्धीकरण आणि वातशमन केले जाते.

Basti | sakal

नस्य (Nasya)

नाकात औषधी तेल टाकून मेंदू, सायनस, त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारलं जातं.

Nasya | sakal

Raktamokshanaरक्तमोक्षण (Raktamokshana)

शरीरावर जळू (Leech) ठेवून रक्तातून दूषित घटक काढून त्वचेचे आजार आणि सूज कमी केली जाते.

Raktamokshana | sakal

मानसिक स्वास्थ्यावर परिणाम

नियमित पंचकर्माने डोक्यातील गुंतागुंत दूर होते, झोप सुधारते आणि मेंदूला 'रीसेट' मिळतो.

Mental Health | sakal

ऋतू बदलात अनिवार्य उपाय

तज्ज्ञ सांगतात की हिवाळा-पावसाळ्यासारख्या ऋतूंमध्ये पंचकर्म केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य टिकवता येते.

Seasonwise Panchakarma Is A Must | sakal

सकाळी उपाशीपोटी फक्त 2 तुळशीची पाने! होतात 'हे' 5 फायदे

Benefits of Eating Basil Leaves Empty Stomach in Morning | sakal
आणखी वाचा