संतोष कानडे
१६९५ मध्ये पंढरपूरवर मोठे संकट आले. मुघल सम्राट औरंगजेबाची छावणी पंढरपूरजवळ पडली होती.
औरंगजेबाचा तळ पंढरपूरपासून फक्त २० मैलांवर, बेगमपुरा (ब्राह्मपुरी) येथे होता.
औरंगजेबाने देशभरातील अनेक मंदिरे पाडली होती. आता विठोबाचे मंदिरही धोक्यात आले होते.
अशा संकटाच्या काळात पंढरपूरच्या गोपाळ विठ्ठल बडव्यांनी एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला.
विठोबाची मूर्ती सूर्याजी आणि जिवाजी पाटलांना देण्यात आली. त्यांनी ती आपल्या शेतातील विहिरीत लपवली.
जर हल्ला झाला असता, तर मराठा सेनापती मदत करतील, असे लेखी आश्वासन छत्रपती राजाराम महाराजांनी दिले होते.
१६९९ मध्ये औरंगजेबाची छावणी तिथून हलली. तेव्हा मूर्ती परत पंढरपुरात आणण्याचा निर्णय झाला.
११ ऑक्टोबर १६९९ रोजी बडव्यांनी सही करून मूर्तीची जबाबदारी परत घेतली. याची कागदोपत्री नोंद आहे.
अखेरीस, विठोबाची मूर्ती पुन्हा मंदिरात बसवण्यात आली. विठोबाची वनवास यात्रा संपली आणि भक्तांचे डोळे आनंदाने पाणावले.