सकाळ डिजिटल टीम
पितृदोष म्हणजे काय आणि याची कारणं व उपाय काय आहेत जाणून घ्या.
Pitru Dosh
sakal
पितृदोष म्हणजे पूर्वजांनी केलेल्या चुकांमुळे किंवा त्यांच्या अपूर्ण इच्छांमुळे त्यांच्या वंशजांच्या कुंडलीमध्ये निर्माण होणारा एक दोष. हा दोष कुटुंबाला आणि त्या व्यक्तीच्या जीवनाला विविध प्रकारे प्रभावित करतो. असे म्हंटले जाते.
Pitru Dosh
sakal
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा कुंडलीतील नवव्या घरात (पूर्वजांचे स्थान) सूर्य, राहू, किंवा केतू या ग्रहांची युती होते किंवा त्यांची स्थिती योग्य नसते, तेव्हा पितृदोष तयार होतो.
Pitru Dosh
sakal
पितृदोषाच्या प्रमुख लक्षणांमध्ये सतत आर्थिक अडचणी, वारंवार आजारपण, वैवाहिक जीवनात कलह, संततीप्राप्तीमध्ये अडथळे, आणि कामाच्या ठिकाणी अपयश यांचा समावेश होतो.
Pitru Dosh
sakal
हा दोष व्यक्तीच्या जीवनात स्थिरता येऊ देत नाही. यामुळे कुटुंबात अशांतता, मानसिक ताण, आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकतो.
Pitru Dosh
sakal
असे मानले जाते की, पितरांचे श्राद्ध व्यवस्थित न केल्यास, त्यांचा सन्मान न राखल्यास, किंवा त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्यास हा दोष लागतो.
Pitru Dosh
sakal
पितृदोष शांत करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत, जसे की श्राद्धविधी करणे, गरीब आणि गरजूंना दानधर्म करणे, आणि विशिष्ट पूजा-अर्चा करणे.
Pitru Dosh
sakal
श्राद्ध हा पितृदोष निवारणाचा एक महत्त्वाचा विधी आहे. श्राद्ध केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद कुटुंबाला मिळतात.
Pitru Dosh
sakal
पितृपक्षाच्या काळात पूर्वजांचे श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितृदोष कमी होतो. हा काळ पूर्वजांना शांतता देण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
Pitru Dosh
sakal
Pitrupaksha
sakal