Monika Shinde
गर्भपात हा कोणत्याही महिलेसाठी केवळ शारीरिक नव्हे तर मानसिकदृष्ट्याही मोठा आघात असतो.
या काळात शरीरात होणारे बदल, वेदना आणि थकवा यामुळे योग्य विश्रांती व काळजी घेणं आवश्यक असतं.
गर्भपातानंतर रक्तस्त्राव, वेदना किंवा ताप असल्यास स्वतः औषधं घेणं टाळा. आणि नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या
या काळात संक्रमणाचा धोका अधिक असतो. टॅम्पन वापरू नका; त्याऐवजी स्वच्छ सॅनिटरी पॅड वापरा आणि दर ३-४ तासांनी बदलत राहा.
गर्भाशय अजूनही संवेदनशील असतो. त्यामुळे पूर्णपणे बरे झाल्यानंतरच आणि डॉक्टरांच्या परवानगीनेच संबंध ठेवावेत. लवकर संबंध ठेवल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो.
गर्भपातानंतर शरीर कमकुवत असतं. या काळात जड वस्तू उचलणे, धावपळ किंवा जोरदार व्यायाम करणं टाळा.
रक्तस्त्रावामुळे शरीरात लोह आणि इतर पोषक घटकांची कमतरता होते. हिरव्या पालेभाज्या, डाळी, फळं, सुकामेवा आणि दूध यांचा समावेश आहारात करा. मसालेदार आणि तेलकट अन्न टाळा.
या सवयी शरीराच्या पुनर्प्राप्तीवर परिणाम करतात आणि हार्मोनल संतुलन बिघडवतात. या काळात पूर्णतः दूर राहणं चांगलं.