संतोष कानडे
प्रल्हाद जानी ऊर्फ 'माताजी' हे एक भारतीय योगी होते, ज्यांनी ७० वर्षांहून अधिक काळ अन्न आणि पाण्याशिवाय जिवंत राहिल्याचा दावा केला होता.
वयाच्या ११ व्या वर्षापासून त्यांनी संन्यास घेतला आणि अंबा मातेच्या भक्तीत स्वतःला समर्पित करून खाण्यापिण्याचा पूर्णपणे त्याग केला.
त्यांच्या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी २००३ आणि २०१० मध्ये 'डीआरडीओ'च्या शास्त्रज्ञांनी त्यांच्यावर दोन वेळा कडक वैद्यकीय चाचण्या केल्या.
अहमदाबादच्या स्टर्लिंग हॉस्पिटलमध्ये त्यांना १५ दिवस २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते.
या काळात त्यांनी पाण्याचा एक थेंबही पिला नाही आणि एकदाही नैसर्गिक विधी (लघवी किंवा विष्ठा) केले नाहीत, ज्याने डॉक्टरांना थक्क केले.
त्यांच्या टाळूतील एका छिद्रातून 'अमृत' स्रवत असून त्यातूनच आपल्याला ऊर्जा मिळते, असे माताजींचे म्हणणे होते.
वैद्यकीय विज्ञानानुसार पाण्याशिवाय माणूस फार काळ जगू शकत नाही, मात्र माताजींच्या बाबतीत विज्ञानाचे सर्व नियम सपशेल अपयशी ठरले.
माताजींच्या शरीरातील या विस्मयकारक बदलाचा उपयोग भविष्यात अंतराळवीर आणि सैनिकांच्या दीर्घकालीन जगण्यासाठी होऊ शकतो का, यावरही संशोधन झाले.
प्रल्हाद जानी नेहमी लाल वस्त्रे आणि नथ परिधान करून राहत असत, त्यामुळे त्यांना भक्त आदराने 'चुंदडीवाला माताजी' म्हणत.
मे २०२० मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी या 'मिस्ट्री मॅन'चे निधन झाले, पण त्यांच्या अन्नाशिवाय जगण्याचे कोडे आजही अनुत्तरितच राहिले आहे.