Anuradha Vipat
प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे
हा ड्रीम प्रोजेक्ट पडद्यावर आणणं सोपं नव्हतं. यासाठी प्राजक्ताने अथक मेहनत घेतल्याचं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं सांगितलं आहे
प्राजक्ता माळी म्हणाली की, मी फुलवंतीसाठी मानधन घेतलं नव्हतं. मी पैसा लावला नव्हता, त्यामुळे त्या दृष्टीने मी सेफ होते.
पुढे प्राजक्ता माळी म्हणाली की,जवळपास एकवर्ष हा प्रोजेक्ट पैशांअभावी थांबला होता, त्यामुळेच मी एवढी मरमर केली.
पुढे प्राजक्ता माळी म्हणाली की,किमान ५० लोकांच्या दारात जाऊन मी या प्रोजेक्टसाठी पैसे द्या अशी मागणी केली होती.
पुढे प्राजक्ता माळी म्हणाली की, मी तेव्हा एक कॉन्ट्रॅक्ट साइन केलं होतं. त्यावर असं लिहिलं होतं की, प्राजक्ता माळींना आम्ही इतके करोड देतोय, हा चित्रपट जर बंद पडला किंवा ऑक्टोबर २०२४ च्या आधी जर हा चित्रपट पूर्ण झाला नाही तर, इतके कोटी रुपये प्राजक्ता माळी आम्हाला परत देतील तेही १८ टक्के व्याजासकट...
‘फुलवंती’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळालं आहे