Monika Shinde
दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसल्याने शरीरावर गंभीर परिणाम होतात. ही सवय टाळली नाही, तर आरोग्य बिघडू शकतं.
बराच वेळ बसून राहिल्यास शरीर कॅलरी खर्च करत नाही. यामुळे वजन वाढतं आणि स्थूलपणास सुरुवात होते.
हलचाली कमी केल्यामुळे स्नायूंमध्ये ताकद राहत नाही. हाडंही कमजोर होतात आणि दुखण्यांची शक्यता वाढते.
जास्त बसल्यामुळे टाइप २ मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढ, हृदयविकार आणि मासिक पाळीच्या तक्रारी वाढू शकतात.
फोनवर बोलताना उभं राहा, दर तासाला थोडं चालून घ्या. असे छोटे बदल आरोग्यास फायदेशीर ठरतात.
गडद हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात. त्या हृदय व किडनीच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
पालक ही उत्कृष्ट पालेभाजी आहे. ती रक्तवाहिन्यांचा ताठरपणा कमी करते आणि हृदयाच्या कार्यासाठी उपयुक्त ठरते.
मग बसण्याची सवय कमी करा, दररोज थोडी हालचाल वाढवा आणि आहारात पालेभाज्यांचा भरपूर समावेश करा.