Pranali Kodre
रविचंद्रन अश्विन... फक्त भारताचा महान ऑफस्पिनर नाही, तर क्रिकेटमधली प्रत्येक अडचण सोडवणारा प्रॉब्लेम सॉल्वर आहे.
R Ashwin
Sakal
२०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर मालिका गमावल्यानंतर या पठ्ठ्याने स्वतःला एक वचन दिलं होतं 'यापुढे भारताला मायदेशात कधीही हारू द्यायचं नाही!'
R Ashwin
Sakal
अन् त्यानंतर पुढची ११ वर्षे भारताने मायभूमीत तब्बल १८ मालिका जिंकल्या अन् त्यात अश्वीनचं योगदान महत्त्वाचं राहिलं. भारताच्या मायदेशातील वर्चस्वाचा अश्विन सर्वात मोठा शिल्पकार होता.
R Ashwin
Sakal
१०६ कसोटींमध्ये ५३७ विकेट्स, ३७ फाईव्ह विकेट्स हॉल, ११ मालिकावीर पुरस्कार आणि ६ शतकांसह ३५०३ धावा त्याने केल्या.
पण अश्विन फक्त आकडेवारीपुरता मर्यादित कधीच नव्हता. जेव्हा जग म्हणायचं ऑफस्पिन म्हणजे एकच बॉल हजारदा टाकणं, तेव्हा या पठ्ठ्याने नवनवीन प्रयोग केले, कधी रन-अप बदलला, तर कधी कॅरम बॉल अन् दुसराचे variations शोधले आणि ऑफ स्पिनला नव्या शिखरावर पोहोचवलं.
R Ashwin
Sakal
दुखापत असो, संघातून वगळलं जाणं असो किंवा भाषेची अडचण असो, प्रत्येक समस्येवर त्याने मार्ग शोधला.
R Ashwin
Sakal
आपल्या कारकिर्दीत त्याने एकही मायदेशातील कसोटी सामना पदार्पणापासून निवृत्तीपर्यंत मिस केला नाही, ही त्याच्या शिस्तीची आणि क्रिकेटवरील निष्ठेची आणखी एक मोठी खूण आहे.
R Ashwin
Sakal
अश्विनने भारतासाठी १३ वर्षं दिली. अनेकदा संकटातून संघाला बाहेर काढलं आणि प्रत्येक टप्प्यावर स्वतःला बदलत राहिला. म्हणूनच अश्विनसारखा खेळाडू भारताला पुन्हा मिळणं सोपं नाही.
R Ashwin
Sakal
अश्विन फक्त विकेट घेणारा गोलंदाज नव्हता, तो सतत शिकणारा, प्रयोग करणारा, समस्या सोडवणारा आणि संघासाठी शेवटपर्यंत झगडणारा क्रिकेटर होता.
R Ashwin
Sakal
Cricketers With Engineering Degrees
Sakal