'राजकारण गेलं मिशीत’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

राजकारण गेलं मिशीत’

ज्येष्ठ ग्रामीण लेखक रा. रं. बोराडे यांच्या ‘अगं अगं मिशी’ या कथेवर आधारित ‘राजकारण गेलं मिशीत’ हा चित्रपट १९ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शन आणि अभिनय

या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी जबाबदारी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांभाळली आहे.

विचार करायला लावणारा

सध्या देशभरात निवडणुकीच्या या वातावरणात प्रेक्षकांना मनसोक्त हसवणारा आणि त्यांना विचार करायला लावणारा असा ‘राजकारण गेलं मिशीत’ हा चित्रपट आहे.

या चित्रपटाची निर्मिती

या चित्रपटाची निर्मिती बकुळी क्रिएशन्सची असून पटकथा आणि संवाद योगेश शिरसाठ यांचे आहे.

मुख्य भूमिकेत

मकरंद अनासपुरे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 

विश्वास व्यक्त

या राजकीय चित्रपटाला आपल्या आधीच्या चित्रपटांसारखाच उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केला आहे.

सिनेक्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना मुक्ता बर्वेचा खास सल्ला