Monika Shinde
तुम्हाला ही प्रश्न पडला असेल राजीव गांधी आणि आतंकवाद विरोधी दिन यांचा नेमका काय संबंध आहे चला तर जाणून घेऊया
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी एका भयानक आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात हत्या करण्यात आली होती.
हा हल्ला श्रीलंकेत सुरू असलेल्या यादवी युद्धाशी संबंधित लिट्टे (LTTE) या दहशतवादी संघटनेने केला होता.
त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि दहशतवादाविरोधात जनजागृती करण्यासाठी भारत सरकारने २१ मे हा "राष्ट्रीय आतंकवाद विरोधी दिवस" म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला.
या दिवशी नागरिकांना दहशतवादाविरोधात लढा देण्याची आणि शांततेच्या मार्गावर चालण्याची शपथ दिली जाते.
राजीव गांधी यांच्या बलिदानामुळेच हा दिवस आज भारतभर आतंकवादाविरोधातील दृढ निश्चयाचा प्रतीक म्हणून ओळखला जातो.