रक्षाबंधनाला भावाच्या कपाळावर अक्षता का लावतात? जाणून घ्या कारण

Vinod Dengale

राखीची परंपरा

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण आपल्या भावाला टिळा लावून त्याला राखी बांधते. यावेळी टिळ्यावर अक्षता लावण्याचीही परंपरा आहे.

tradition 

|

eSakal 

टिळा का?

भुवयांच्या मधोमध तिलक लावणं शुभ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार हे स्थान ज्ञान आणि चेतनेचं केंद्र मानलं जातं.

Tilak 

|

eSakal 

अक्षता का?

‘अक्षत’ म्हणजे अखंड किंवा न तुटलेला तांदूळ. त्यामुळे अक्षता भाऊ-बहिणीचं नातं कायम अखंड राहण्याचं प्रतीक मानली जाते.

Akshata 

|

eSakal 

दीर्घायुष्य

रक्षाबंधनाला भावाला अक्षता लावताना त्याच्या दीर्घायुष्याची आणि मंगलमय आयुष्याची कामना केली जाते. भावाचं आयुष्य सुखी आणि समृद्ध राहावं, अशी भावना असते.

Long Life 

|

eSakal 

समृद्धी

धार्मिक परंपरेत तांदळाला समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे अक्षता लावल्याने भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येत राहावी, अशी मान्यता आहे.

prosperity 

|

eSakal 

विष्णू-लक्ष्मी

काही धार्मिक मान्यतांनुसार टिळ्याचा संबंध भगवान विष्णूंशी आणि अक्षतांचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो. त्यामुळे टिळा आणि अक्षता यांना शुभ मानलं जातं.

Vishnu-Lakshmi

|

eSakal 

अखंड अक्षता

अक्षता लावताना तांदळाचे दाणे तुटलेले किंवा खंडित नसावेत, अशी परंपरा आहे. कारण ‘अक्षत’ म्हणजेच अखंड.

Akshata 

|

eSakal 

भावना

अक्षता लावण्यामागे भाऊ-बहिणीचं नातं सदैव प्रेमाने आणि विश्वासाने जोडलेलं राहावं, अशी भावना आहे.

Rakhi 

|

eSakal 

मिठात लवंग ठेवणं शुभ का मानलं जातं? जाणून घ्या कारण

SALT AND CLOVE

|

esakal

हेही वाचा