Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवले आहे.
त्याच्या नेतृत्वात भारताने २०२४ टी२० वर्ल्ड कप आणि २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच मुंबई इंडियन्सने ५ आयपीएल ट्रॉफी देखील मुंबई इंडियन्सच्या नेतृत्वात जिंकली.
यानंतर आता रोहितच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये स्टँड नाव देण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे.
१५ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.
याबाबत एका कार्यक्रमात बोलताना रोहितने प्रतिक्रिया दिली असून अशा सन्मानाची कल्पना केली नव्हती असं त्याने म्हटले आहे.
रोहितने म्हटले, 'जेव्हा तुम्हाला असा सन्मान मिळतो की तुमचं नाव स्टँडला दिलं जातं, ही अशी गोष्ट आहे ज्याची मी कल्पनाच करू शकत नव्हतो.'
वानखेडे स्टेडियमवर यापूर्वीच पॉली उम्रीगर, सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांच्या नावाचे स्टँड्स आहेत.