घोडा पाण्यात अडकला अन्... नाहीतर शंभुराजांनी गोवा महाराष्ट्राला जोडला असता

Yashwant Kshirsagar

शंभुराजांचा स्वराज्यविस्तार

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांनी स्वराज्याच्या सीमा उत्तरेत दिल्ली व दक्षिणेत गोव्यापर्यंत वाढवल्या.

Sambhaji Maharaj Goa Campaign | esakal

समुद्रावर नियंत्रणाची दूरदृष्टी

“सागरावर ज्यांचे वर्चस्व, त्यांच्या सीमा यमुना पार जातात.” – शिवाजी महाराज. हेच विचार शंभुराजांच्या डोळ्यासमोर होते.

Sambhaji Maharaj Goa Campaign | esakal

जहाजबांधणी केंद्रांचे निरीक्षण

शंभुराजांनी बाणकोट, जैतापूर, राजापूर, डिचोली येथे जहाजबांधणी केंद्रे सुरू केली. सागरी संरक्षणासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला.

Sambhaji Maharaj Goa Campaign | esakal

गोव्यावर स्वारीचा निर्णय

औरंगजेबाच्या स्वारीदरम्यान पोर्तुगीज खूपच उत्साही झाले. त्यांना धडा शिकवण्यासाठी शंभूराजांनी गोव्यावर मोहीम आखली.

Sambhaji Maharaj Goa Campaign | esakal

मर्दनगडावर हल्ला

पोर्तुगीजांनी मर्दनगड (सेंट स्टिफनचा किल्ला) वेढला. ४० मराठे किल्ल्यात असतानाही त्यांनी तग धरला. शेतीचे बांध फोडून आजूबाजूला पाणी केले.

Sambhaji Maharaj Goa Campaign | esakal

मराठ्यांची कुमक

३०० मावळ्यांची दुसरी तुकडी किल्ल्यात दाखल झाली आणि संभाजीराजे स्वतः येऊन धडकले. गोळीबार सुरू झाला.

Sambhaji Maharaj Goa Campaign | esakal

पळणारा व्हाईसरॉय

व्हाईसरॉय अलव्होर पळून गेला. शंभूराजांनी त्याचा पाठलाग केला, पण पावसामुळे घोडा वाहून गेला. खंडो बल्लालांनी घोडा वाचवला.

Sambhaji Maharaj Goa Campaign | esakal

वीरगती आणि सन्मान

या लढाईत कृष्णाजी कंक वीरमरण पावले. शंभूराजांनी त्यांच्या तीन वर्षांच्या मुलाला किताब दिला आणि सरदारकी बहाल केली.

Sambhaji Maharaj Goa Campaign | esakal

गोवा महाराष्ट्रात असता?

ही स्वारी यशस्वी झाली असती तर, गोवा प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट झाला असता, असं अनेक इतिहासकार मानतात.

Sambhaji Maharaj Goa Campaign | esakal

खूप खास आहे सोफिया कुरेशी यांची लव्ह स्टोरी; 'अशी' झाली होती पहिली भेट

Sofia Qureshi Love Story | esakal
येथे क्लिक करा