थेट 'राजधानी’ म्हणून जन्म घेणारे शहर म्हणजे सातारा, 'या' छत्रपतींनी केली स्थापना

राहुल शेळके

सातारा - मराठ्यांची राजधानी

सातारा शहर थोरल्या शाहू महाराजांनी वसवले. मराठ्यांच्या साम्राज्याची ही राजधानी सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाची होती.

Satara City History | Sakal

शहराचा जन्म

१७०८ साली शाहू महाराज छत्रपती झाले, तेव्हा त्यांनी थेट हे शहर वसवण्याचा निर्णय घेतला. त्याआधी तिथे कोणतेही गाव नव्हते.

Satara City History | Sakal

पहिले नियोजित शहर

सातारा हे मराठ्यांचे पहिलेच नियोजित शहर ठरले. ते गाव किंवा वस्तीतून विकसित झाले नाही, तर थेट शहर म्हणून उदयास आले.

Satara City History | Sakal

व्यापारी पेठांचा विकास

शाहू महाराजांनी साताऱ्यात सोमवार, मंगळवार, सदाशिव पेठ, माची पेठ आणि केसरकर पेठ अशा अनेक व्यापारी पेठा वसवल्या.

Satara City History | Sakal

बसाप्पा खोजेंचे योगदान

शहराच्या विकासात बसवंत आप्पा कासुरडे (बसाप्पा खोजे) यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या नावानेही एक पेठ वसवण्यात आली.

Satara City History | Sakal

पाण्याची आधुनिक सोय

सन १७१५ सालीच शाहू महाराजांनी साताऱ्यात कालव्यांच्या मदतीने पाणीपुरवठा सुरू केला. हे पुणे आणि कोल्हापूरपेक्षा कितीतरी वर्षे आधी झाले.

Satara City History | Sakal

शहरातील इतर वस्त्या

राजसपुरा, व्यंकटेशपुरा, चिमणपुरा, रघुनाथपुरा अशा अनेक नवीन वस्त्या तयार झाल्या, ज्यामुळे शहराचा विस्तार झाला.

Satara City History | Sakal

लष्करी तयारी

सातारा शहर इतके सुरक्षित होते की, शाहू महाराजांनी ५०,००० सैन्य लगेच गोळा करता येईल अशी तयारी ठेवली होती.

Satara City History | Sakal

कधीच हल्ला झाला नाही!

१७०८ ते १७४९ या काळात सातारा शहरावर कधीही हल्ला झाला नाही. रायगड, पुणे यांवर हल्ले झाले, पण सातारा नेहमी सुरक्षित राहिले.

Satara City History | Sakal

सातारा: एक अभिमानास्पद राजधानी

शिवकाळानंतर सातारा हे फक्त मराठ्यांचेच नाही तर देशाचेही महत्त्वाचे राजकीय केंद्र बनले.

Satara City History | Sakal

वटपौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या वडाच्या झाडाचे 'हे' 8 अद्भुत फायदे!

Benefits Of Banyan Tree | Vat Purnima | sakal
येथे क्लिक करा