संतोष कानडे
वैज्ञानिक दृष्टिकोनातून मृत्यू ही एक क्षणिक घटना नसून ती एक दीर्घ प्रक्रिया आहे.
हृदय बंद पडल्यानंतरही मानवी मेंदू सुमारे ७ मिनिटांपर्यंत सक्रिय राहू शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे.
या शेवटच्या ७ मिनिटांत मेंदू आपल्या आयुष्यातील सर्व आठवणी एखाद्या चित्रपटासारख्या पुन्हा एकदा वेगाने पाहतो.
मृत्यूच्या वेळी मेंदूमध्ये 'सेरोटोनिन' सारखी रसायने मोठ्या प्रमाणात वाढतात, ज्यामुळे व्यक्तीला विलक्षण शांतता आणि आनंदाचा अनुभव येतो.
हृदय आणि फुफ्फुस थांबल्यानंतरही मेंदूच्या पेशी ऑक्सिजनशिवाय ३ ते ७ मिनिटांपर्यंत जिवंत राहू शकतात.
काही रुग्णांना 'नियर डेथ एक्सपिरियन्स'मध्ये पांढरा प्रकाश दिसतो, जो प्रत्यक्षात मेंदूतील लहरींच्या अतिसक्रियतेचा परिणाम असतो.
मृत्यूनंतर शरीरातील रक्तप्रवाह थांबल्यामुळे त्वचा पांढरी पडू लागते आणि स्नायू ताठर होण्यास सुरुवात होते, ज्याला 'रिगर मॉर्टिस' म्हणतात.
व्यक्ती मृत घोषित केल्यानंतरही शरीरातील कान हे सर्वात शेवटी बंद पडणारे ज्ञानेंद्रिय आहे, म्हणजेच मृत व्यक्ती काही काळ ऐकू शकते.
शरीरातील काही पेशी मृत्यूनंतरही अनेक तास किंवा काही दिवसांपर्यंत जिवंत राहून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात.
शरीराचे हृदय ४ ते ६ तास, यकृत ८ ते १२ तास आणि डोळे सुमारे २४ तासांपर्यंत दानासाठी जिवंत राहू शकतात.