Saisimran Ghashi
आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत की पाणी उभे राहून पिऊ नये. पण कधी विचार केला आहे का, यामागे काय शास्त्र आहे?
आज आपण याच रहस्याचा उलगडा करणार आहोत.
उभे राहून एका श्वासात पाणी प्यायल्याने ते थेट पोटात जाते, ज्यामुळे हवा आणि पाणी एकत्र मिसळून गॅस आणि अपचन होऊ शकते.
पोटात पाणी आणि हवा भरल्याने अन्न नीट पचत नाही आणि त्यातील पोषक तत्त्वे शरीरात पूर्णपणे शोषली जात नाहीत.
उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी घशातून जलद जाते आणि तोंडाला पुरेसा वेळ मिळत नाही, ज्यामुळे संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो.
एका घोटात उभे राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुसावर ताण येऊ शकतो.
उभे राहून पाणी प्यायल्याने स्नायूंना ताण येऊ शकतो आणि पाठदुखी किंवा कंबरदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात.
उभे राहून पाणी प्यायल्याने किडन्यांवर जास्त ताण येतो आणि त्यांना जास्त काम करावे लागते, ज्यामुळे किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
असे वाटू शकते की उभे राहून पाणी प्यायल्याने तुम्हाला लवकर तहान भागेल, पण खरं तर यामुळे तुम्हाला लवकर तहान लागू शकते आणि निर्जलीकरण होऊ शकते.
आयुर्वेदानुसार, उभे राहून पाणी प्यायल्याने वात आणि कफ दोष वाढू शकतात, ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात.
उभारून पाणी पिल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम लगेचच दिसतील असे नाही पण वाढत्या वयासोबत त्रास सुरू होऊ लागतो.