संतोष कानडे
किन्नरांच्या अंत्यसंस्कारांबद्दल अनेकांना माहितीच नसते. हे एक प्रकारचं गूढ आणि रहस्य आहे.
किन्नर हे फक्त पैसे मागणारे नसून शुभकार्यांमध्ये त्यांना मान दिला जातो. त्यांचे आशीर्वाद मोलाचे मानले जातात.
आजही समाजात किन्नरांना सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यांना त्यासाठीही संघर्ष करावा लागतो.
किन्नरांच्या अंत्यसंस्कारात बाहेरील लोकांना येऊ दिले जात नाही. याचं एक वेगळंच रहस्य आहे.
असा विश्वास आहे की, एखाद्याने हे विधी पाहिल्यास पुढच्या जन्मात तो किन्नर होऊ शकतो.
अंत्यसंस्कारावेळी मृतदेहाला चप्पलने मारले जाते. ही प्रथा हजारो, लाखो वर्षांपासून पाळली जाते.
असंही मानलं जातं की, मृतदेहाला चप्पल मारल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि पुढचा जन्म बदलतो.
किन्नरांचे अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला अग्निडाग दिला जात नाही, तर मृतदेह दफन केला जातो. हा विधी बहुतेक रात्री होतो.
किन्नर समाजामध्ये मृत्यूनंतर आनंद व्यक्त केला जातो, कारण त्यांना मुक्ती मिळते, असे मानले जाते.