Pranali Kodre
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांची आपले प्राण गमावले. त्यामुळे संपूर्ण देश हादरला.
या हल्ल्यानंतर भारतातून पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाटही उसळसली. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भाष्य करताना मर्यादा ओलांडल्या.
त्याने या हल्ल्यासाठी त्याने भारताच्या सैन्यालाच दोषी ठरवलं. त्याने म्हटले की ते सुरक्षा देण्यात असमर्थ ठरले.
याशिवाय त्याने मीडियाने ही घटना ज्याप्रकारे कव्हर केली, त्यालाही बॉलिवूडचे नाव दिले होते. त्यामुळे भारतातूनही आफ्रिदीविरुद्धही संताप व्यक्त होतोय.
आफ्रिदीला त्याच्या या वागण्याबाबत भारताचा माजी सलामीवीर शिखर धवननेही खडेबोल सुनावताना म्हटले की अशा कमेंट्स करण्यापेक्षा तुमच्या देशाच्या प्रगतीसाठी डोकं चावलं. त्याने आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा अभिमान असल्याचेही सांगितले.
यानंतर आता आफ्रिदीच्या विरुद्ध भारताकडून मोठे पाऊल उचलण्यात आले असून त्याचे युट्यूब चॅनलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
आफ्रिदीपूर्वी शोएब अख्तर, तनवीर अहमद आणि बासित अली यांच्याही युट्यूब चॅनेलवर भारतात बंदी आहे.