संतोष कानडे
शास्ताखान हा मुघल सम्राट औरंगजेबाचा मामा होता. औरंगजेबाने मामाला खास दक्षिणेत पाठवून दिले होते.
परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी शास्ताखानाची बोटं छाटून ते पार्सल माघारी पाठवून दिलं.
शास्ताखान हा एक चांगला कवी होता, अशी इतिहासामध्ये माहिती आढळून येते.
विशेष म्हणजे हा शास्ताखान संस्कृत भाषेत कविता लिहायचा, असा उल्लेख आढळतो.
त्याच्या संस्कृत भाषेतील कविता चतुर्भुज या ब्राह्मणाने 'रस-कल्पद्रुम' या संकलनात संग्रहित केल्या आहेत.
रस-कल्पद्रुम हा कवितासंग्रह शास्ताखानाच्या आर्थिक मदतीने निर्माण झाला होता.
या ग्रंथाची आजही चर्चा होते, त्याचं कारण शास्ताखानाच्या सहा कविता याच्यात आहेत.
रसकल्पद्रुम हा १७४५ विक्रम संवत (इ.स. १६८८) मध्ये संकलित केलेला एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे.
शाइस्ता खान याने स्वतः रचलेले संस्कृतमधील सहा श्लोकही या ग्रंथात समाविष्ट आहेत.
मुस्लिम शासकांनी संस्कृत साहित्याला दिलेल्या आश्रयाचे हे एक उदाहरण म्हणावे लागेल.