Shiv Jayanti 2025 : छ.शिवाजी महाराजांनी बांधले पहिले धरण, आजही शेतकऱ्यांना देतेय भक्कम आधार

Yashwant Kshirsagar

पाण्याची सोय

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण महाराष्ट्रातील हवामान लहरी असल्याने अवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि प्रजेला पिण्याच्या पाण्याचा त्रास होत होता.

Shivaji Maharaj Water Management | esakal

शिवगंगा नदी

डॉ.अनिल सिंगारे यांनी 'सकाळ'मधील लेखात म्हटले आहे की, शिवाजी महाराजांनी इ. स. सन 1648 मध्ये खेड तालुक्यातील शिवापूर येथे शिवगंगा नदीवर मध्यम स्वरूपाच्या धरणाच्या निर्मितीचे नियोजन केले

Shivaji Maharaj Water Management | esakal

धर्म मार्तंड

पण नदी अडवून त्यावर धरणे बांधणे, हे तत्कालीन धर्ममार्तंडांना मान्य नव्हते. कारण वाहती नदी अडवणे घोर पातक आहे असा प्रचार त्यांनी केल्यामुळे नदीवर धरण बांधणे हे निषेधार्ह मानले जात होते.

Shivaji Maharaj Water Management | esakal

प्रजेच्या हितासाठी

तरीही शिवाजी महाराजांनी त्यांचा आदेश झुगारून प्रजेच्या हितासाठी शिवगंगा नदीवर धरणाची निर्मिती केली. हा शिवाजी महाराजांच्या जलव्यवस्थापनाचा एक महत्त्वपूर्ण प्रयोग आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात ३२ धरणे बांधली.

Shivaji Maharaj Water Management | esakal

साळोबाचे धरण

गेली अनेक वर्षे दुष्काळ पडला तर खेड -शिवापुरच्या नागरिकांना याच पाण्याने जगवलं. अगदी दहा वर्षांपूर्वी आलेल्या दुष्काळात देखील या साळोबाच्या धरणानेच पाणी पुरवले.

Shivaji Maharaj Water Management | esakal

दूरदृष्टी

छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी दूरदृष्टी दाखवली याचा आज आपल्या पिढीला ही फायदा होत आहे. आजही या धरणाचा लाखो लोकांना फायदा होत आहे.

Shivaji Maharaj Water Management | esakal

विहिरीची निर्मिती

जिजाऊंच्या सल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचाड येथेही विहिरीची निर्मिती केली. बांधकामाच्या दृष्टिकोनातून या विहिरीचे बांधकाम मराठा शिल्पकलेचे उत्तम उदाहरण मानले जाते.

Shivaji Maharaj Water Management | esakal

Shiv Jayanti 2025 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जमिनीचं मोजमाप कसं व्हायचं?

Shivaji Maharaj Water Management | esakal
येथे क्लिक करा