छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देणारा हा गड, तुम्ही पाहिला आहे का?

Monika Shinde

भूपाळगड

सांगली-सोलापूरच्या सीमेवर वसलेला भूपाळगड हा इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण आहे. दुर्गम पण मनमोहक, हा गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देतो.

गडावर कसा जाल?

भूपाळगड गाठण्यासाठी कराड–विटा–पळशी किंवा सांगली–भिवघाट मार्गाने जाता येते. स्वतःचे वाहन घेऊन जाणे सोयीचे, कारण रस्ते काहीसे वेडावाकडे आहेत.

गडाची रचना

भूपाळगड खडकाळ डोंगररांगेत आहे. उंचावर असलेला हा गड उघड्या दगडांनी तयार झाल्यामुळे दूरूनच लक्ष वेधतो. तटबंदी आजही काही ठिकाणी उरली आहे.

निसर्ग आणि वातावरण

गडाच्या परिसरात झाडी कमी, पण दगड आणि पठार यांचे सौंदर्य वेगळेच भासते. माणदेशी वातावरणाची झलक येथे स्पष्टपणे जाणवते.

ऐतिहासिक मंदिर

गडाच्या मध्यभागी एक उंच टेकडीवर महादेवाचे मंदिर आहे. मंदिराशेजारी बहिजी नाईक जाधव यांचे स्मारक आहे, जे शिवरायांचे गुप्तहेरप्रमुख होते, असे मानले जाते.

ऐतिहासिक महत्त्व

हा गड शिवाजी महाराजांनी बांधल्याचे सांगितले जाते. पुढे फिरंगोजी नरसाळा यांची येथे नेमणूक झाली होती. अनेक ऐतिहासिक लढाया इथे घडल्या आहेत.

आयुष्यभर एकाच जोडीदाराशी नातं ठेवणारे प्राणी!

येथे क्लिक करा