सकाळ वृत्तसेवा
शिवाजी महाराजांसाठी गड म्हणजे केवळ संरक्षण नव्हे, तर स्वराज्याच्या मुळाशी असलेले बळ होते. १६७१-७२ मध्ये महाराजांनी गडांच्या दुरुस्ती आणि नव्या बांधकामासाठी १,७५,००० होन खर्च मंजूर केला होता.
राजधानी रायगडासाठी तब्बल ५०,००० होन मंजूर करण्यात आले होते. यात ३५,००० होन घरे व तळी यासाठी, तर १५,००० होन तटबांधणीसाठी होते.
सिंहगड, विजयदुर्ग, राजगड, प्रतापगड आदी १० किल्ल्यांसाठी प्रत्येकी १०,००० होन खर्च ठरविण्यात आला होता.
महिपतगड, सुधागड, लोहगड, श्रीवर्धनगड यांसारख्या गडांवर प्रत्येकी ५,००० होन खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोटीगड, सारसगड, मनोहरगड यांसाठीही १,००० ते ३,००० होन खर्च करण्यात आला. किरकोळ दुरुस्तीसाठी ७,००० होन बाजूला ठेवले होते.
मोरोपंत पेशवे आणि निराजीपंत मुजुमदार यांनी खर्चावर आक्षेप घेतला – "लोक व पैसा दोन्ही फार खर्ची पडत आहेत".
महाराजांनी परखड उत्तर दिले: "दौलत आहे, विचार करूनच खर्च करतो." गडांमुळेच स्वराज्य सुरक्षित राहते आणि शत्रूपासून संरक्षण होते असे त्यांचे मत होते.
"३६० गड आहेत, एक एक गड वर्ष लढला तरी ३६० वर्षे शत्रूला लागतील" – असा दूरदृष्टीपूर्ण विचार महाराजांनी मांडला होता. हाच महाराजांचा दुर्गदृष्टिकोन होता!