श्रावणात ब्रह्मगिरी प्रदक्षिणा का करावी? जाणून घ्या प्रमुख कारणं

सकाळ डिजिटल टीम

पवित्र महिना

श्रावण महिना हा हिंदू धर्मात पवित्र महिना मानला जातो. पण या महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला अधिक महत्त्व का आहे. या मागची कारणे जाणून घ्या.

Brahmagiri Pradakshina | sakal

शंकराचे निवासस्थान

श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. ब्रह्मगिरी हे भगवान शंकराचे निवासस्थान मानले जाते. या पवित्र महिन्यात येथे प्रदक्षिणा केल्याने भगवान शंकराची विशेष कृपा लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Brahmagiri Pradakshina | sakal

पापांचा नाश

ब्रह्मगिरी पर्वत हे पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. गोदावरीला दक्षिण गंगा मानले जाते. श्रावणात तिच्या उगमाची प्रदक्षिणा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला पावित्र्य लाभते असे मानले जाते.

Brahmagiri Pradakshina | sakal

आध्यात्मिक साधना

ही प्रदक्षिणा केवळ एक धार्मिक विधी नसून ती एक आध्यात्मिक साधना असल्याची मान्यता आहे. या प्रदक्षिणेमुळे आत्म्याला शांती मिळते, मानसिक शुद्धीकरण होते आणि मोक्षाच्या दिशेने वाटचाल होते आशी लोकांची भावनीक श्रद्धा आहे.

Brahmagiri Pradakshina | sakal

सकारात्मक ऊर्जा

श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी परिसर पावसाने न्हाऊन निघाल्याने हिरवागार आणि निसर्गरम्य असतो. अशा आल्हाददायक वातावरणात प्रदक्षिणा केल्याने मनाला असीम शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

Brahmagiri Pradakshina | sakal

इच्छांची पूर्तता

अनेक भाविकांचा असा विश्वास आहे की, श्रावण महिन्यात पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केल्यास त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि इच्छांची पूर्तता होते.

Brahmagiri Pradakshina | sakal

ब्रह्मगिरी

त्र्यंबकेश्वर येथे दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो आणि ब्रह्मगिरी हे या कुंभमेळ्याचे एक महत्त्वाचे स्थान आहे. कुंभमेळ्याशी संबंधित या पवित्र स्थळाची श्रावणात प्रदक्षिणा करणे विशेष पुण्यकारक मानले जाते.

Brahmagiri Pradakshina | sakal

परंपरा

ब्रह्मगिरी प्रदक्षिणेची परंपरा अनेक शतकांपासून चालत आलेली आहे. या परंपरेचे पालन करणे म्हणजे आपल्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा भाग बनणे होय.

Brahmagiri Pradakshina | sakal

नकारात्मक विचार

असे मानले जाते की, या प्रदक्षिणेमुळे वाईट शक्तींचा नाश होतो आणि जीवनातील अडचणी दूर होतात. यामुळे व्यक्तीला नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते आणि सकारात्मकतेकडे वाटचाल होते. असे म्हंटले जाते.

Brahmagiri Pradakshina | sakal

कुठे आहे शंभूराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊंचा वाडा?

Where is the Wada of Dharau who breastfed Chhatrapati Sambhaji Raje? | esakal
येथे क्लिक करा