Anuradha Vipat
मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुलेनं नाटक, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे
सध्या भार्गवीच्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाचे प्रयोग मुंबई, पुणे, नाशिक येथे सुरू आहेत
नुकताच तेथे घडलेली एक गंमत भार्गवीनं नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं प्रेक्षकांबरोबर शेअर केली आहे.
भार्गवी म्हणाली, “प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक क्षण येतो की, आपण त्या क्षणाला ‘ब्लॅंक’ होऊन जातो.
भार्गवी पुढे म्हणाली, परवाच्या प्रयोगाला असंच झालं होतं. मी स्टेजवर पूर्णपणे ‘ब्लॅंक ऑफ इंडिया’ झाले आणि तसं झाल्यानंतर कुठल्याही कलाकाराच्या डोळ्यांत ते दिसतं. मी विचार करतेय- वाक्य काय आहे
भार्गवी पुढे म्हणाली त्या क्षणाला मला ते वाक्य आठवलं. फायनली मी ते वाक्य बोलली आणि म्हणून नाटक पुढे गेलं. नाही तर बराच वेळ नाटक तिथेच अडकून राहिलं असतं. पण, त्या दिवशी मी खरंच मनापासून रंगदेवतेची माफी मागितली की, माझ्या हातून काय चुकलं असेल, तर मला माफ कर.