Pranali Kodre
२९ जून २०२४... भारतीय क्रिकेटच्या इतिहास कायमस्वरुपी ही तारीख कोरली गेली.
याच दिवशी एक वर्षांपूर्वी म्हणजे २९ जून २०२४ रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट संघाने टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरलं.
बार्बाडोसच्या मैदानात झालेल्या टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिका संघाला ७ धावांनी पराभूत केलं.
या विजयासह भारताने दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप उंचावला. यापूर्वी २००७ मध्ये भारताने एमएस धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप जिंकला होता.
रोहित दोन टी२० वर्ल्ड कप जिंकणारा भारताचा एकमेव खेळाडूही ठरला. २००७ च्या टी२० वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचाही तो भाग होता.
हा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विजयाची चव चाखायची म्हणून रोहितने मैदानावरील माती तोंडातही टाकली. इतकंच नाही, तर भारताचा तिरंगाही त्याने मैदानात अभिमानाने रोवला.
वर्ल्ड कप स्वीकारताना पोडियमवर भारतीय खेळाडू उभे असताना कर्णधार रोहित रोबो सारखी अॅक्शन करत ट्रॉफी घेण्यासाठी आला आणि ट्रॉफी स्वीकारल्यानंतर सर्वांनी मिळून ती उंचावली.
या सामन्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
या विजेतेपदाबद्दल बीसीसीआयने भारतीय संघासाठी तब्बल १२५ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली होती.
तसेच भारतीय संघ मुंबईत परतल्यानंतर त्यांची ओपन बसमधून विजयाची मिरवणूक काढण्यात आलेली, त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर सर्वांचा सत्कारही करण्यात आलेला.