सकाळ डिजिटल टीम
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही तीन दिवसांपूर्वी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं
राज्यामध्ये सध्या जी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावरुन तिने भाष्य केलं
तिनं 'एक्स'वर पोस्ट करताना म्हटलं की, आपला महाराष्ट्र असा कधीच नव्हता
'दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच… आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता.'
अशी पोस्ट तिने केली होती. तिची पोस्ट सोशल मीडिया तुफान व्हायरल झाली. त्यावर चर्चादेखील झाल्या
राज्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून ज्या गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत, त्याने सगळेच चिंतीत आहेत
त्यामुळे तेजस्विनीदेखीनी आक्रमक झाली होती. कलाकारांनी भूमिका घेणं गरजेचं असतं, हे यातून दिसून आलं
राज्य सरकार राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पावलं उचलणार का, हे पाहावं लागेल