Vinod Dengale
उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही वेळी जर तुम्हाला स्वर्ग अनुभवायचा असेल तर या महाराष्ट्रातल्या ठिकाणी तुम्ही नक्की जायला हवं..
हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील धोम धरण. हे धरण वाई तालुक्यात, कृष्णा नदीवर वसलेले आहे.
1976-82 दरम्यान बांधलेले हे धोम धरण पर्यटन, बोटिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे.
सकाळ-सकाळी सुर्योदयाच्या वेळी या ठिकाणी पाण्यात असणारे बदक एक वेगळा अनुभव देतात.
धरणाच्या तीन्ही बाजूला असनारा सह्याद्री एक वेगळाच नजारा देतो. थंडावा अनुभवायचा असेल तर या ठिकाणी नक्की जा.
धोम धरणाच्या दृश्याची तुलना लडाखच्या पॅंगॉन्ग तलावाशी केली जाते. सकाळी किंवा सूर्यास्थावेळी येतील मनमोहक दृश्य तुम्हाला प्रेमात पाडतात.
धोम धरणजवळ महाबळेश्वर आणि पाचगणी ही पर्यटन स्थळे आहेत.
फॅमिली, मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत फिरायला जायचे असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे.
The 1757 Battle That Changed India Forever
eSakal