Aarti Badade
गडचिरोलीच्या वैणगंगा काठावर वसलेलं हे मंदिर – अध्यात्म, निसर्ग आणि स्थापत्यकलेचा संगम!
अत्यंत भक्तीमय आणि पुराणप्रसिद्ध ऋषी मार्कंडेय यांचं हे तपोस्थान – आजही भक्तांसाठी पवित्र तीर्थक्षेत्र.
मार्कंडेय ऋषींच्या कठोर तपस्येमुळे प्रसन्न झाले भगवान शिव, आणि दिलं अमरत्वाचं वरदान.
वैणगंगा नदीच्या शांत लाटांमध्ये मंदिराचं प्रतिबिंब – एक अलौकिक अनुभव.
कधीकाळी २४ मंदिरे असलेलं संकुल – आज सहाच उरले, पण त्यांची भव्यता अबाधित.
रामायण, महाभारत, दैवी प्राणी आणि प्रतीकात्मक कथा – प्रत्येक भिंतीवर इतिहास जिवंत!
वीज पडल्याने मुख्य शिखराचं नुकसान, पण १९व्या शतकात गोंड शासकांनी पुन्हा उभं केलं वैभव.
शिल्पकलेच्या वारशाचं रक्षण करत मंदिराच्या महा मंडपात भक्कम खांब व कमानी घालून दिला आधार.
आजही मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात उभं, भक्तांना अध्यात्मिक ऊर्जा आणि कलात्मक प्रेरणा देतं.