शेतीसाठी आपल्या सैन्याला ४ महीने पगारी रजा देणारा एकमेव राजा

सकाळ वृत्तसेवा

शिवराय – 'कुळवाडीभूषण' का?

महात्मा फुले यांनी शिवरायांना 'कुळवाडीभूषण' संबोधले, कारण त्यांनी कृषी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

फक्त राजकीय नव्हे, तर कृषी स्वराज्यही!

शिवरायांचे स्वराज्य केवळ राजकीय नव्हते. त्यांनी शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणावरही भर दिला. मात्र, कृषी स्वराज्याचा स्वतंत्रपणे फारसा उल्लेख आढळत नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

पत्रव्यवहारातून दिसते कृषीस्वराज्याची झलक

शिवरायांच्या पत्रव्यवहार आणि आज्ञापत्रांतून शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या अनेक नोंदी सापडतात, ज्या त्यांच्या कृषी दृष्टीकोनाची साक्ष देतात.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

उभ्या पिकांतून सैन्य नको!

शिवरायांनी उभ्या पिकांतून सैन्य जाऊ नये, यावर बंदी घातली. नाइलाज झाला, तर नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी कठोर निर्णय

शेतकऱ्यांची कोणतीही वस्तू जबरदस्तीने घेऊ नये, गरज असल्यास त्याची किंमत अदा करूनच ती घ्यावी, असे सक्त आदेश महाराजांनी दिले.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

अन्यायकारक वतनदारीऐवजी रयतवारी पद्धती

वतनदारी पद्धतीत शेतकऱ्यांवर अन्याय होत होता. त्यामुळे शिवरायांनी ती बंद करून थेट रयतवारी पद्धत लागू केली.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

लष्कराला पगारी सुट्टी, शेतीला मदत!

पावसाळ्यात चार महिने लष्कराला पगारी सुट्टी मिळत असे. हे सैनिक शेतीच्या कामात मदत करत, ज्यामुळे उत्पादन वाढत असे.

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

कृषी स्वराज्याने रयतेला आर्थिक स्थैर्य!

शिवरायांनी शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा दुहेरी मार्ग आखून दिला, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य निर्माण होऊन खरी कृषी समृद्धी घडली!

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal

अमरावतीच्या अंबादेवी मंदिराला आली होती शिवरायांच्या लग्नाची पत्रिका

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal
येथे क्लिक करा