Aarti Badade
पाकिस्तान आज अणुबॉम्बसाठी ओळखला जातो, पण या खऱ्या कहाणीच्या मागे दडलेले आहे एक रहस्य – चोरी, विश्वासघात आणि आंतरराष्ट्रीय कारस्थान!
१९७४ मध्ये भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी केली आणि पाकिस्तान हादरला. झुल्फिकार भुट्टो यांनी तेव्हाच निर्धार केला: "आम्ही गवत खाऊ, पण अणुबॉम्ब बनवू!"
भोपाळजवळ जन्मलेले खान फाळणीनंतर पाकिस्तानात आले. युरोपमध्ये त्यांनी धातुविज्ञानाचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्यांना युरेनको कंपनीत नोकरी मिळाली.
खान यांनी युरेनियम संवर्धनासाठी अत्यंत गोपनीय असलेल्या सेंट्रीफ्यूजची डिझाईन्स चोरली. हीच चोरी पाकिस्तानच्या अणुबॉम्बची जननी ठरली.
१९७५ मध्ये खान चोरलेले महत्त्वपूर्ण दस्तऐवज घेऊन पाकिस्तानात परतले. भुट्टो यांनी त्यांच्यावर पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाची जबाबदारी सोपवली.
खान यांनी बनावट कंपन्यांचे एक मोठे जाळे तयार केले. युरोपातून आवश्यक उपकरणे आणण्यासाठी त्यांनी दलाल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा वापर करून तस्करी केली.
१९८० च्या दशकात चीनने पाकिस्तानला अणुबॉम्बची डिझाईन, आवश्यक साहित्य आणि मिसाइल तंत्रज्ञान पुरवले. हा सहभाग अत्यंत गुप्त आणि प्रभावी होता.
१९९८ मध्ये भारताच्या अणुचाचणीनंतर पाकिस्तानने चगाई पर्वतावर ५ अणुचाचण्या केल्या आणि जगाला हादरा दिला. यानंतर खान ‘बॉम्बचे जनक’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
२००४ मध्ये हे उघड झाले की खान यांनी अणुबॉम्बचे तंत्रज्ञान इराण, उत्तर कोरिया आणि लिबियाला विकले होते. या घटनेमुळे जगभरात संतापाची लाट उसळली.
आज पाकिस्तानकडे सुमारे १७० अणुबॉम्ब आहेत. पण या यशाच्या मागे दडलेली आहे अब्दुल कादिर खान यांची एक गूढ, तणावपूर्ण आणि चित्तथरारक कथा.